By बाजीगर, 4 February, 2026

क्लीन बोल्ड

महाराष्ट्र क्रिकेट संघटना,
सर्वोच्च कोर्टात ली घटना ||

MCA निवडणूक प्रकरण,
सदस्यवाढ हे कारण ||

सरन्यायाधीश संतापले,
MCA प्रमुख असावा
माजी खेळाडू,
इथे घराणेशाही
नका काढू.

MCA चे सदस्य १६४,
काकांच्या नातू नं ,
गुपचुप पक्ष धार्जिणे
४०० सदस्य वाढविले आतून ||

ही कृती बेकायदेशीर,
मी डीसमिस करू का,
का करताय उशीर??

जर सदस्यसंख्या
वाढवायची,
तर माजी खेळाडूंसाठी
राखीव काढवायची ||

ज्यांना धरता येत
नाही बॅट ,
त्यांची का सदस्य म्हणून
करतात बात?!

By युयुत्सु, 4 February, 2026

"गोल्डमेडल"
========================

- राजीव उपाध्ये (पूर्वप्रसिद्धी ऑक्टोबर २०१३)
ही गोष्ट आहे मी कॉलेजात असतानाची...

By बाजीगर, 3 February, 2026

एप्रिल मध्ये काकांची,
संपतीय मुदत,
मग बदलावीच,
लागणार आदत ||

राज्यसभेत नाही प्रवेश,
म्हणून हा नाट्यप्रवेश ||

नुसती भावनिक
पाजा वाईन,
पाळीव पत्रकार
देती हेडलाइन ||

अपुरी संख्याबळे
मग बोला बळेबळे ||

देऊन आवळा
(१० आमदार)
पाहिजे कोहळा
(४१ आमदार) ||

प्रत्येक चाली ला,
काटशह देऊन,
नानांनी केलंय
दीन-लीनकरण ||

लोक राहिले नाहीत
पूर्वीसारखे अडाणी,
आता काय उपयोग
भेटायला येऊन अदानी ||

रीटायर चा ढोंगीपणा,
वर्षापूर्वी नसता केला,
६० वर्षाचा सन्मान
असहाय्य नसता गेला ||

By आजी, 3 February, 2026

ब्रेक या विषयावर मला खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं. ब्रेक म्हणजे सिरीयल मधले ब्रेक बरं का! मध्ये मध्ये गॅप असते ना ती!

या गॅपमध्ये म्हणजे ब्रेकमध्ये मालिका दहा मिनिटे असते आणि ब्रेक वीस मिनिटांचा असतो. या ब्रेक मध्ये खूप गोष्टी काही काही जण करून घेतात. म्हणजे नॅचरल कॉल्स उरकून घेणे ,गाद्या घालणे , झोपण्यापूर्वी दात घासणे.

By विवेकपटाईत, 3 February, 2026

मानव ऋषीने दगड घासून अग्नी प्रज्वलित केला. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली “हे अग्नी, सुख-समृद्धी दे, शत्रूंवर विजय मिळवून दे.” त्याने उच्चारले: “अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम.

तेवढ्यात हवनकुंडातून एक धुरकट अशरीरी आकृती प्रकट झाली. हात जोडून उभी. ती म्हणाली, “मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझं भोजन. मानवाच्या इच्छा पूर्ण करणं, हाच माझा धर्म.”

By गणेशा, 3 February, 2026

जवळजवळ आता एक आठवडा होत आला आहे दादा गेल्यानंतर. एका राजकारणी माणसाचा अंत मनाला इतका चटका लावून जाईल, असं कधीच वाटलं नव्हतं.
त्या दिवशी सकाळी मी जिममध्ये होतो. तेवढ्यात आमच्या दादाचा फोन आला— “तुमचे अजित दादा गेले.”
पहिल्यांदा मला काहीच कळलं नाही. “दादा गेले म्हणजे कुठं गेले?” असा उलट प्रश्न मी विचारला. दादांच्या विमानाला अपघात झाला हे ऐकल्यावर मात्र मन सुन्न झालं. लगेच मोबाईल पाहिला. यात दादा नसावेत, किंवा यातून ते वाचले असावेत, अशी एखादी बातमी पुढे यावी असं मनोमन वाटत राहिलं; पण नियतीचा फास उलटाच पडला होता.

By Deepak Pawar, 2 February, 2026

दाटलेली हुरहूर
मन असं सैरभैर
कुणाचे हे रंग सारे
पसरले मनभर
काय झाले असे
मन वेडेपिसे
कुणाचे हे मनावर उमटले ठसे.

रंग न्हाली सांज येई
कुणाची ही भूल पडे
गंध ओल्या वाऱ्यातून
कुठे मन दूर उडे
शोधिते कुणाला
कळेना मनाला
झाडातून पानातून कोण आता दिसे
कुणाचे हे मनावर उमटले ठसे.

उमललेल्या पहाटेस
सपनात येई कोण
बहरल्या वेलीपरी
मोहरुन जाई मन
कुणाचे हे रूप
मनभर धूप
पसरून दिसभर गंधाळते जसे
कुणाचे हे मनावर उमटले ठसे.

https://youtu.be/RBXDiuu3qT8

By विवेकपटाईत, 30 January, 2026

सरकार बदलली तरी तेच-तेच लोक टोप्या बदलून पुन्हा सत्तेत येतात. पुन्हा सत्तेची मलाई खाण्यात ते दंग होतात. (चाट जीपीटीच्या मदतीने बनविलेले चित्र)

By Bhakti, 30 January, 2026

सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय(कोणाला आपल्याबद्दल काही वाटलं तरी आपण बदलू नाही ,हा बेसिक नियम मान्यच असेल ..:))

तर मी माझ्या क्षेत्राशिवाय अजूनही काही विशेष पाहत असते.मुळात अज्ञानी राहायला आवडत नाही.३ इडियट मधल्या रांचोचा एक डायलॉग मला फार रिलेट होतो,कायमच... "चारो तरफ ज्ञान बट रहा है, जहाँ से मिले लपेट लो".अशाप्रकारे ज्ञान मिळवणं जीवनाच्या आनंदाचं झाड आहे.