(उर्फ: “निकाल आले, पण अर्थ कुणाला लागला?”)
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल आज अखेर जाहीर झाले आणि लगेचच राज्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा “आम्ही जिंकलो”, “नैतिक विजय आमचाच”, “जनतेने स्पष्ट कौल दिला” अशा घोषणांची आतषबाजी सुरू झाली. निकाल कोणताही असो, प्रत्येक पक्षाच्या गळ्यात विजयाची माळ, तर पराभवाची माळ मात्र नेहमीच “जनतेच्या चुकीच्या समजुतींनी” किंवा “ईव्हीएमच्या गडबडीने” दुसऱ्याच कुणाच्या गळ्यात पडलेली दिसते.

