जगाचं खरंच वागणं वेगळं आणि केवळ ज्ञात्याला कळणारं, ज्ञात्यालाच जगातल्या साऱ्या सिद्धी वश होणार, इतर मात्र नुसतंच झटापटीत वेळ आणि श्रम घालवणार आणि अपयश आल्यावर याच जगाला नावं ठेवत निराश होऊन, निसर्गाला दूषणं देत या जगासमोर सपशेल शरणागती घेऊन काहीशा पराभूत भावनेनेच जगाचा निरोप घेणार सिकंदरासारख. या जगाचं चरित्र मात्र ज्याला कळलं, स्वरूप कळलं तो तरला, साऱ्या जगालाही तारून घेऊन गेला. या निसर्गाची कुठलीच बाब निरुपयोगी नाही, प्रत्येक क्षण हा सुमुहूर्त, प्रत्येक जागा हि मोक्याची जागा, वस्तूचा प्रत्येक कण न कण हा मोलाचा.

