विसरून पार गेलो, मीही असे लिहीत
आकाश अक्षरांचे दिनरात रंगवीत
शब्दातल्या कळ्यांना नव्हते फुलायचेच
पण आतच वसंता बसलोच आळवीत
केव्हातरी यशाची येई झुळूक मंद
स्वच्छंद लेखनाचे तारू तरंगवीत
शाली नकोत आता ना पुषगुच्छ हार
घेई लपेटुनी मी मधुचांदणे पुनीत
झेपावतो कळेना कोठे शकुंत आता
अश्वत्थ शांत मौनी पाने थरारतात
त्या अनुभवामृताला सीमा असीमतेची
मी नादरूप वेडा सगुणी सणासुदीत
बिलगून अक्षरांना फुटती झरे अनंत
मग धुंद रान गाई वेडे विहंगगीत
--अशोक गोडबोले, पनवेल.